Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज जीवन चरित्र व शिकवण निबंध लेखन pdf| Chhatrapati Shivaji Maharaj Life Biography and Teachings Essay Writing Pdf | chatrapati shivaji maharaj charitra v shikvan pdf

 छत्रपती शिवाजी महाराज जीवन चरित्र व शिकवण  निबंध लेखन pdf Chhatrapati Shivaji Maharaj Life Biography and Teachings Essay Writing Pdf  chatrapati shivaji maharaj charitra v shikvan pdf 

छत्रपती शिवाजी महाराज (toc)

छत्रपती शिवाजी महाराज जीवन परिचय - 

दिनांक - १९ फेब्रुवारी २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ,देशात व जगात साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त आपण छत्रपती शिवाजी महाराज  यांचे जीवन चरित्र Chhatrapati Shivaji Maharaj Life Biography व आधुनिक तंत्रज्ञानाचा काळात त्यांची शिकवण आपले जीवन घडवताना उपयोगी पडणार आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराजपरिचय 
नाव छ.शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले
आईचे नाव राजमाता जिजाऊ(जिजाबाई)
जन्म १९ फेब्रुवारी १६३०
पत्नी चे नाव सईबाई ,सोयराबाई ,पुतळाबाई ,काशीबाई
मुलीअंबिकाबाई, कमळाबाई, दिपाबाई ,राणू बाई
मुलगेछत्रपती संभाजी महाराज भोसले ,छत्रपती राजाराम राजे भोसले
चलन  शिवराई
राज्याभिषेक६ जून इ. स.१६७४ 
मृत्यू  ३ एप्रिल  १६८०

छत्रपती शिवाजी महाराज जन्म व बालपण - भाषण  निबंध लेखन Information about Chhatrapati Shivaji Maharaj 

आदरणीय व्यासपीठ, गुरूजणवर्ग आणि माझ्या  मित्र- मैत्रिणींनो  आज आपण  एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहोत . संपूर्ण देशाला व जगाला अभिमान आहे ते म्हणजे  शूर वीर पराक्रम छत्रपती शिवाजी महाराज .
'' कोट्यावधी देवांची अब्जावधी मंदिर असताना
पण  एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींचा हृदयावर 
आधिराज्य करतात 
त्यांना छत्रपती शिवाजी महाराज  म्हणतात ".


“पुत्र जिजाऊंना झाला , 
पुत्र शहाजी राजांना झाला

        पुत्र महाराष्ट्राला झाला आणि

         मुघलांचा कर्दनकाळ झाला ..

         माझा “शिवबा” जन्माला आला.”

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर  फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९फेब्रुवारी १६३० साली  शिवनेरी किल्ल्यावर  राजमाता जिजाऊ व शहाजीराजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला .
छत्रपती शिवाजी महाराज भाषण


बालपण व संस्कार

शिवबांवर आई जिजाऊंनी लहानपणा पासून उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडविले.शिवाजी महाराज अवघे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली आणि वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली.

शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली, शूर वीरांच्या व रामायण महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले अशा या संस्कारांमुळे शिवाजीराजे घडले. 

 छत्रपती शिवाजी महाराजांचे यांचे नाव शिवराय नाव का ठेवले ?

शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे या देवीच्या नावावरूनच राजमाता जिजाऊ यांनी राजांचे नाव शिवाजी ठेवले होते त्यांना आपण शिवराय, शिवबा व शिवाजी राजे या नावाने ओळखतो.

शिवगर्जना 

आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम

महाराsssss ज

गडपती

गजअश्वपती

भूपती

प्रजापती

सुवर्णरत्नश्रीपती

अष्टवधानजागृत

अष्टप्रधानवेष्टित

न्यायालंकारमंडित

शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत

राजनितिधुरंधर

प्रौढप्रतापपुरंदर

क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर

महाराजाधिराज

राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.


स्वराज्यनिर्मीती

  अवघ्या १४ व्या वर्षी  स्वराज्यनिर्मीती निर्माण करण्याचे धाडसी स्वप्न पाहिले आणि त्या दृष्टीने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवून प्रत्यक्षात उतरविले. स्वराज्यनिर्मीतीच्या या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले पण ते किंचितही कधी डगमगले नाही त्यांनी स्वराज्य निर्मितीचे आपले कार्य अविरत सुरू ठेवले.
 तानाजी, सूर्याजी, बाजीप्रभू, जिवा महाला असे जीवाला जीव देणारे मावळे जमविले. स्वराज्यनिर्मीतीची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडाचा पराक्रम, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात.

राजमुद्रा

शिवाजी महाराज जेव्हा पुण्याचा कारभार पाहत होते तेव्हा त्यांनी राजमुद्रा तयार केली.त्या राज्यमुद्रे वर  संस्कृत भाषेत खालील प्रमाणे लिहिले होते .

“ प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनौः
             शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ”
 राजमुद्रे वर   संस्कृत मध्ये लिहिलेल्या ओळींचा  अर्थ
ती राजमुद्रा मराठीत असे सांगते की  
“  जोपर्यंत  प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साया विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजीचा पुत्र शिवाजीची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.”

छत्रपती शिवाजी महाराज भाषण  चारोळ्या शायरी 

“विजेसारखी तलवार चालवून गेला, 
कुलदैवत श्री राजा शिवछत्रपती तुम्ही.”
निधडया छातीने हिंदुस्थान हालवून गेला, 
वाघनख्याने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला, 
मूठभर मावळयांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला
 स्वर्गात गेल्यावर देवांनी 
ज्याला झुकून मुजरा केला 
असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला.”

“ शिवरायांचे आठवावे रूप
 शिवरायांचा आठवावा प्रताप 
शिवरायांचा आठवावा साक्षेप 
भूमंडळी ... हिंदवी स्वराज्याचे 
संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.”

“ झंझाविला भगव्याचा समान तुम्ही, 
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
 घडविले श्री चे स्वराज्य तुम्ही, 
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे 

शिवराज्याभिषेक

६ जून इ. स.१६७४ रोजी शिवाजी राजे यांचा रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन सुरू केले नवीन कालगणना सुरू होऊन नवा शक सुरु झाला. फारसी संस्कृत बनवला गेला आर सी च्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकूम जारी केले सुमारे साडेतीनशे  वर्षे जुलमी शासन गुलामगिरीत पडलेल्या अन्यायाने ग्रासलेल्या अत्याचाराने त्रासलेल्या गोरगरीब रयतेला लोक कल्याणकारी न्यायप्रिय असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने मिळाला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू


छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु ३ एप्रिल  १६८० रोजी प्रकृती खालावत गेल्याने रायगड किल्ल्यावर हनुमान जन्मोत्सव च्या दिवशी वयाच्या 50 व्या वर्षी झाला त्यांच्यासह त्यांच्या चौथ्या पत्नी महाराणी पुतळाबाई सती झाल्या उत्तम शासक उत्तम राजे मनाठा साम्राज्याचे संस्थापक हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघणारे एक शक्तिशाली निष्ठावान पराक्रमी आपल्या जाज्वल्य पराक्रमाने इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कायम प्रत्येक भारतीयांच्या मनात सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे.
“विजेसारखी तलवार चालवून गेला, 
निधडया छातीने हिंदुस्थान हालवून गेला, 
वाघनख्याने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला, 
मूठभर मावळयांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला
 स्वर्गात गेल्यावर देवांनी 
ज्याला झुकून मुजरा केला 
असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला.”


  व्हिडिओ - छत्रपती शिवाजी महाराज भाषण 


 

छत्रपती शिवाजी महाराज जीवन चरित्र व शिकवणChhatrapati Shivaji Maharaj Life Biography and Teachings Essay Writing Pdf 

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी शिवनेरीवर जिजाऊंच्या पोटी रयतेच्या रक्षणकर्त्याने जन्म घेतला आणि सह्याद्रीला जाग आली.म्हणून म्हणावे वाटते की
" *सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभूराजा; दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा..."*

त्यांनी शौर्याची मशाल पेटवली. त्यांच्या पराक्रमाची, निश्चयाची, निर्धाराची गाथा ऐकतच आपण सर्व  मोठे झालो आहोत .
*"निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी!"*

एक महान भारतीय राजा, परकीयांशी संघर्ष करून जिद्दीने, मावळ्यांच्या साथीने ,हिंमतीने शून्यातून स्वतःचे राज्य निर्माण केले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्याच्या स्वराज्याचा भगवा रोवला.
**"भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही.
भगवा म्हणजे सह्याद्री, भगवा म्हणजे स्वराज्य, भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती होय."**
शिवाजीराजांच्या जन्मदिवशी 'शिवजयंती'ला शिवरायांचा जयघोष करणे सोपे आहे. त्याऐवजी शिवाजी महाराजांचे समाजाला जीवदान देणारे विचार, जे त्यांच्या स्वराज्याची प्रेरणा होती. ती त्यांची शिकवण चरित्रातून जाणून घेऊन त्याचा रोजच्या आयुष्यात उपयोग करू.

लहानपणीच बालशिवाजीला युद्धाभ्यास, रणनीतीचे शिक्षण गुरुवर्य दादाजी कोंडदेवांकडून लाभले. शौर्याचा वारसा पिता शहाजींकडून आणि मातोश्री जिजाऊने शिवाजीच्या हृदयात स्वराज्य निर्माणाची ज्योत प्रज्वलित केली.


Chhatrapati Shivaji Maharaj Life Biography and Teachings

शिकवणीत शिवाजीराजे म्हणतात...

१ 'सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरू, नंतर पालक, नंतर देव!' सर्वप्रथम स्वतःकडे न पाहता राष्ट्राकडे पाहा.

२. 'राज्य छोटं का असेना स्वतःच असावं. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व निर्माण कर, तरच जग तुमचा आदर करेल'. मित्रांनो! आयुष्यात कोणाच्या सावलीखाली उभे राहू नका. झगडल्याशिवाय स्वतःचे अस्तित्व निर्माण होत नाही आणि अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही. त्याचबरोबर स्वतःचे अस्तित्व अबाधित राखता आले पाहिजे.


३ 'शत्रूची फौज मोजण्यापेक्षा आपल्याजवळील फितूर किती ते मोजा.' संख्येला महत्त्व कधीच नसते (उदा. कौरवांचे सैन्य). पाय खेचणारे शत्रू (फितूर) नेहमी आपल्याजवळच असतात.

४ 'शत्रूला दुर्बल समजू नका. पण अधिक बलवान समजून घाबरूही नका' प्रत्येकाने स्वतःच्या क्षेत्रात काम करताना आजूबाजूच्यांना कमी लेखू नका, स्पर्धेत कोणीही पुढे जाऊ शकतो. न घाबरता काटशह देणे महत्त्वाचे असते. शिवाजी महाराजांची प्रत्येक लढाई प्रेरणादायी होती. कारण महाराजांच्या मावळ्यांची संख्या कमी आणि तुलनेने शत्रुपक्षाचे सैनिक व युद्धसामग्रीचे बळ नेहमीच प्रचंड असायचे.


५ "समोर संकट दिसले, तर लढायचं. मरण आले तरी चालेल, शत्रूला शरण जाणार नाही की, माघारी फिरायचे नाही" हे त्यांचे ब्रीद होते. त्याच्याच पुढे ते म्हणतात, "विजय त्याचाच होतो, जो विजयासाठी साहस करतो." शत्रूच्या छावणीत घुसून बोटे छाटणारे, वाघनखे घुसवणारे निर्भीड शिवराय आठवा. आयुष्यात लढा देताना प्रत्येक प्रसंगी 'मी जिंकणार' या भावनेतून खेळलात, तरच पुढे जाल.


६ 'योग्य निर्णय घ्या. परिस्थिती बदल्यास त्याहून जास्त महत्त्वाचे, तुम्ही घेतलेला निर्णय योग्य बनवा.' तुम्ही तुमच्या स्वप्नाकडे वाटचाल करताना परिस्थिती बदल्यास, मनासारखे न झाल्यास, लगेच मागे न फिरता, घेतलेला निर्णय योग्य तन्हेने फिरवा. "जब हौसला बुलंद हो, तो पहाड भी एक मिट्टी का ढेर लगता है।" हे ध्यानात ठेवा.

७ प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घ्यायला हवे. युद्धाच्या वेळी काही वेळा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते. ते चौफेर ज्ञान शिक्षणातून मिळते. कोंढाणा किल्ला लढाई न करता स्वराज्यात दाखल झाला. कठीणप्रसंगी वाद- भांडण युक्तीने हाताळता आले पाहिजेत.

८ महाराजांनी बांधलेले गड-किल्ले हे त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे. आज त्या गड-किल्ल्यांची अवस्था काय आहे? व्यसनाधिनतेकडे वळण्याऐवजी गड चढा. गडाचा इतिहास जाणून घ्या, गडाचे पावित्र्य राखा.

९ 'कुणाही पुढे वाकणार नाही की, झुकणार नाही' याची प्रचिती बालवयातच बालशिवाजीने आदिलशाहीला मुजरा केला नाही तेव्हा दिली.

१० 'शिवाजीराजे कोणत्याही जाती-धर्माविरुद्ध नव्हते, तर ते अन्यायाच्याविरुद्ध होते! एका गालावर मारल्यास दुसरा गाल पुढे करणाऱ्यांमध्ये आम्ही नाही. अन्याय करणार नाही आणि सहनही करणार नाही.

११ 'जाती-धर्माच्या भिंती भेदून माणुसकीने जगायला शिकविणाऱ्या छत्रपतींच्या फौजेत अठरापगड जातीच्या लोकांसह तोफखाना, आरमार अशा महत्त्वाच्या जागी प्रमुख मुसलमान होते.

१२ 'परस्त्री मातेसमान' ही शिकवण मोडणाऱ्यांचे हातपाय तोडले जात होते. अशी कडक शिक्षा आजही पाहिजे. छत्रपतींच्या दरबारात स्त्री कधीच नाचली नाही.

१३ विशेष वैशिष्ट्य : शिवाजी महाराजांनी कुठल्याही गडाला देवाचे नाव,लिंबू-मिरची की, सत्यनारायची पूजा केली नाही. समुद्रात आरमार उभे केले. आमावस्या अशुभ न मानता, त्याच काळोख्या रात्रीच गनिमी काव्याने लढाया केल्या आणि ते जिंकले.

१४ शहाजीराजे गेल्यानंतर, जिजाऊला सती न पाठवल्याने शहाजीच्या मार्गदर्शनाची उणीव भरून निघाली.

१५ 'महाराजांनी दैववाद-अंधश्रद्धा कधीच मानले नाहीत. त्यांचा स्वतःच्या मेंदूवर व मनगटावर विश्वास होता!

शेवटी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, कुशल संघटक, लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले यांना विनम्र अभिवादन! "झाले बहु... होतील बहु... पण शिवरायांसारखा कोणीच नाही! जय जिजाऊ, जय शिवाजी!"

F.A.Q

१) छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला ?
उत्तर - छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला.

२) छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म दिनांक काय आहे ?
उत्तर -  छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म  दिनांक १९ फेेब्रवारी १६३० आहे.

३) छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणता किल्ला सर्वप्रथम जिंकला ?
उत्तर - छत्रपती शिवाजी महाराज यांनी  सर्वप्रथम तोरणगड (किल्ला) जिंकला.
४) छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला ?
उत्तर - छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक रायगड किल्या वर  झाला.









Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad