अण्णाभाऊ साठे जनतेचे लेखक - क्रांतीचा योद्धा
Annabhau Sathe Janata writer - Warrior of the Revolution
अण्णाभाऊ साठे जनतेचे लेखक - क्रांतीचा योद्धा(toc)
परिचय
अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील साहित्य समाज आणि क्रांतीच अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते .ते फक्त एक लेखक नव्हते, तर ते एक सामाजिक कार्यकर्ते ,लोककलावंत ,विचारवंत आणि दलित समाजाच्या हक्कासाठी लढणारे एक महान क्रांतिकारक होते. त्यांनी आपल्या लेखणीतून शोषित पीडित कामगार भटक्या जमातींचे दुःख मानले आणि त्यातून समाजात जागृती घडून आली.
प्रारंभिक जीवन
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाकण गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे. ते मातंग समाजात जन्मले आणि बालपणापासूनच गरिबी, उपेक्षा, शोषण यांचा सामना करत मोठे झाला शिक्षणासाठी संधी नव्हती त्यामुळे त्यांनी औपचारिक शिक्षण पूर्ण केले नाही पण अनुभव आणि संघर्ष हेच त्यांच्या जीवनाचे खरे विद्यापीठ ठरले.
मुंबईत संघर्षमय जीवन.
१९३१ मध्ये केवळ ११ वर्षाचे असताना अण्णाभाऊ मुंबईत आले तेव्हा मुंबई हे औद्योगिक नगरी म्हणून वाढत होते, पण कामगार वर्ग तिथे दारिद्र्याच्या गर्तेत होता.भांडुप ,चेंबूर लालबाग ,गिरणगाव अशा कामगार वस्ती राहून त्यांनी वास्तव्य अनुभवले. त्यांनी मोलमजुरी, कामे करून आपले पोट भरले. याच काळातील लालबावटा कम्युनिस्ट पक्षाच्या संपर्कात आले समाजवादी विचारसरणी त्यांच्या मनावर बिंबली गेली.
साहित्याची सुरुवात.
शाळेची गाठ न पडलेल्या अण्णाभाऊ यांनी आपल्या अनुभवातून आणि लोककलेच्या माध्यमातून लेखन सुरू केले. त्यांनी लोककथा, तमाशा लावणी, पथनाट्य ,लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. . त्यांच्या साहित्याची भाषा ही सहज सुबोध आणि लोकाभिमुख होती. त्यांनी समाजातील विषमता, अन्याय जातीयता यावर कठोर प्रहार करणारी कथा ,कविता, नाटक ,लिहिली.
महत्वपूर्ण साहित्यिक योगदान
आण्णाभाऊ साठे यांनी ३५ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत त्यांच्या काही प्रसिद्ध साहित्य कृती.
फकीरा १९५९- ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी असून एका दलित क्रांतीकाऱ्याच्या जीवनाची कथा आहे. फकीराने समाजातील विषमता लढा आणि परिवर्तन यांचे दर्शन घडवले.
सठीतेल - यात त्यांनी लोककथांच्या माध्यमातून समाजातील सत्य मांडले आहे.
जाती निर्मूलन, अन्यायाविरोधी कथा आणि कवितांमध्ये त्यांनी लोकांच्या आवाजाला शब्द दिला.
त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये नायक गरीब असतो पण जिद्दीचा संघर्षशील असतो ही भूमिका तत्कालीन ब्राह्मणप्रधान साहित्यविश्वाला खु.पण जनतेला ती आपली वाटली.
तमाशा आणि लोककला.
अण्णाभाऊ साठे हे एक अत्यंत प्रतिभाशाली लोककलावंतही होते. त्यांनी लोकनाट्य आणि तमाशा या माध्यमातून सामाजिक प्रश्न उभे केले. त्यांनी सामाजिक क्रांतीचा संदेश गावागावात पोहोचवला. त्यांच्या लावण्या आणि पोवाडा मध्ये विद्रोहीची ठिणगी असते. त्यामुळे लोककलेतून ही समाज जागृती करणे शक्य आहे हे त्यांनी सिद्ध केले.
समाजसेवा आणि राजकीय सहभाग.
१९४३ साली त्यांनी "लाल बावटा" कामगार युनियन मध्ये भाग घेतला. नंतर १९४८ मध्ये त्यांनी दलित साहित्य संमेलन स्थापन केले.१९५० नंतर ते समाजवादी पक्ष आणि नंतर भारिप बहुजन महासंघ मध्ये सक्रिय झाले. त्यांनी दलित कामगार भटक्या विमुक्त समाजाच्या हक्कांसाठी मोठा लढा दिला.
त्यांनी रशियालाही भेट दिली आणि तिथे त्यांच्या साहित्याचे भाषांतर झाले त्यांची कादंबरी "फकीरा" रशियन भाषेत ही प्रकाशित झाले हे त्यांच्या प्रतिभेचे आंतरराष्ट्रीय प्रमाण आहे.
जगण्याची तडफड आणि साहित्याचं बळ.
अण्णाभाऊंचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्ष पराभव पुन्हा उभा राहणार आणि समाजासाठी लढण्याची उर्मी. त्यांनी कधीही आपली परिस्थिती कुणावर दोष देऊन मानली नाही, तर ती बदलण्याची प्रेरणा दिली. त्यांचं लेखन हे फक्त करमणुकीसाठी तर बदल घडवण्यासाठी होतं.
अण्णाभाऊ साठे यांची वैशिष्ट्ये.
१. लोकाभिमुख लेखन- हे समाजातील सर्वसामान्य माणसांसाठी लिहायचे.
२. क्रांतिकारक दृष्टिकोन- त्यांनी लेखणीतून क्रांतीची मशाल पेटवली.
३. संघर्षातून स्फूर्ती- गरीबी वंचना यातून त्यांच्या लेखनाला जीवन मिळालं.
४. जातीव्यवस्थेवर कठोर प्रहार-ते जातीव्यवस्थेचे प्रखर विरोधक होते.
५. सामाजिक समतेचा आग्रह- त्यांच्या साहित्यामागे नेहमी सामाजिक समतेचा विचार होता.
मृत्यु आणि वारसा.
१८ जुलै १९६९ रोजी केवळ ४९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पण तेवढ्या अल्प आयुष्यात त्यांनी समाजावर, साहित्यावर आणि लोकांच्या मनावर अमीट ठसा उमटवला. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या स्मरणार्थ "अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ" स्थापन केले आहे. त्यांचा नावाने अनेक सांस्कृतिक मंडळ, वाचनालय, शाळा आहेत.
अण्णाभाऊ साठे - नव्या पिढीला ऊर्जा .
अण्णाभाऊ साठे हे सामान्य माणसाचे कवी होते, लेखक होते आणि क्रांतीचे जिवंत प्रतिक होते. त्यांचे लेखन केवळ साहित्य नव्हे, तर एक चळवळ आहे . समतेसाठी न्यायासाठी आणि माणसांच्या हक्कांसाठी. आज ही त्यांच्या विचारांची आणि साहित्याची प्रेरणा नव्या पिढीला ऊर्जा देते.
त्यांनी दाखवलेला लढा ,त्यांनी दिलेले शब्द आणि त्यांनी पेटवलेली ज्वाला ही आपल्या सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीसाठी अनमोल ठेवा आहे.
"जो वंचितांसाठी लिहितो, तोच खरा साहित्यिक!"
हीच अण्णा भाऊ साठेंची खरी ओळख आहे.