Type Here to Get Search Results !

मराठा आरक्षण मराठा वीर मनोज जरांगे यांच्या मागण्या | Maratha hero Manoj Jarange demand for Maratha reservation

 मराठा आरक्षण मराठा वीर मनोज जरांगे यांच्या मागण्या  Maratha hero Manoj Jarange demand for Maratha reservation

मराठा आरक्षण मराठा वीर मनोज जरांगे यांच्या मागण्या | Maratha hero Manoj Jarange demand for Maratha reservation



जरांगे यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे

1) सरकारने याची यादी आपल्याला दिली आहे. ती मी सगळ्यांना देणार आहे. ज्या लोकांना प्रमाणपत्रं दिली आहेत, त्याचा डेटाही मागितलेला आहे.

शिंदे समितीची दोन महिने मुदत वाढवली. त्यांनी वर्षभर मुदत वाढवावी. ज्याची नोंद मिळाली नाही त्यांच्या घरातल्यांच्या प्रमाणपत्राच्या आधारे प्रमाणपत्र द्यावे, याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे.

2) 54 लाख नोंदी आणि यांच्या परिवारातील नोंदी आणि त्याच्या आधारावर सगेसोय-यांना प्रमाणपत्र द्यायचे. नोंदी सापडलेल्यांची ज्यांच्याकडे नोंदी सापडल्या नाही त्यांनी शपथपत्र द्यायचं आहे की हा आमचा सगेसोयरे आहे. पण शपथपत्रात आमचे सगळे पैसे तिकडेच जातील, त्यामुळे शपथपत्र मोफत करून द्यायला सांगितलं आहे ते त्यांनी मान्य केलं आहे.

3) अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्यायचे या मागणीबाबत म्हटलंय की गृहविभागाकडून प्रक्रिया सुरू आहे. पण या आदेशाचं पत्र नाही. त्या पत्राची तयारी करावी.

4) वंशावळी जुळवण्यासाठी तालुकास्तरीय समिती गठीत केली आहे. तहसीलदार, पोलीस अधिकारी, मोडी लिपीचे अधिकारी अशी समिती नेमली आहे.

5) क्युरेटीव्ह पिटिशनचा विषय सुप्रीम कोर्टात आहे. सगेसोय-याच्या मार्गाने एखादा राहिला तर क्युरेटीव्ह पीटीशन पूर्ण होईपर्यंत - 100% आरक्षण मिळेपर्यंत सर्व मराठ्यांना 100% मोफत शिक्षण देण्यात यावं. क्युरेटीव्ह पिटीशन मार्फत आरक्षण मिळेपर्यंत मोफत शिक्षण आणि सरकारी भरत्या आरक्षण मिळेपर्यंत करायच्या नाही. शासकीय भरत्या करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेऊन करायच्या. राज्यातील मुलींना केजी टू पीजी शिक्षण देण्याचा सरकारने घेतला आहे.

6) मोफत शिक्षणात बदल करावा मुलींसोबत मुलांचाही उल्लेख करावा, हा जीआर संध्याकाळपर्यंत द्यावा.

"आम्हाला मुंबईत यायची हौस नव्हती. आम्हाला सुद्धा कामं आहेत. आमची इच्छा आहे की आजच्या रात्रीत आम्हाला हा अध्यादेश द्यावा. एकही मराठा आरक्षणापासून वंचित ठेवणार नाही". सग्यासोय-या व्याख्येसह अध्यादेश काढणार असं विधी व न्याय विभागाच्या सचिवांचं म्हणणं आहे. यावर सर्वांनी सह्या केलेल्या आहेत. एवढं झालंय तर अध्यादेश रात्रीतून द्या. वाटल्यास आजची रात्र इकडेच काढतो. कायद्याचा सन्मान करून आज आझाद मैदानात जात नाही पण मुंबई सोडणार नाही.

7) एवढं केलंय तर अध्यादेश द्या. मी ही अभ्यासकांच्या माध्यमातून याचा कीस पाडतो, त्रुटी आहे की नाही याचा अभ्यास करतो, तुम्ही आज रात्रीतून अध्यादेश दिला नाही तर उद्या आझाद मैदानात जाणार, उपोषण सकाळी 11 पासून सुरू केलंय. ते सुरू राहणार.

8) सगेसोय-यांचा अध्यादेश आज संध्याकाळी, किंवा रात्रीत द्या. किंवा उद्या अकरा वाजेपर्यंत द्या. नाहीतर आम्ही आझाद मैदानात जाऊ.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad